देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण
धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची
वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू
नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या
धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या
वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला
प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले
असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.
चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत
आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना
करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ
व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक
विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा
पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के
खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात
अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय
होणार आहे. भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ
इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार
2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार
आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी
युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात
लक्षणीय घट होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-and-cm-shindenchi-closed-door-discussion/