आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील
सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत
अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
सावधगिरीचा पर्याय म्हणूनसर्वच पक्षातील आमदार आणि नेते
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश
टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे.
रात्री पावणे तीन वाजता राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील
यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली.
यावेळी राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात कोणत्या
विषयावर चर्चा झाली, याची अद्याप कोणतीही माहिती समोर
आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा
चांगलाच चालला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत
कोणताही फटका बसू नये, यासाठी अनेक नेते हे मनोज जरांगे
पाटील यांची भेट घेत आहेत. राजेश टोपे यांच्या आधी रात्रीच्या
अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची
भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील
यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी भेट घेत
आहेत. काल रात्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली
सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या आठ
दिवसात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची
दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची भेट
घेण्यासाठी शक्यतो रात्रीची वेळ निवडत आहे. राधाकृष्ण विखे
पाटील यांनीही जरांगेंना भेटण्यासाठी रात्री पावणे दोन वाजताची
वेळ घेतली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/prodigy-in-indias-food-culture-international-report/