मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची
बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
Related News
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात
वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास
आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन
डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र
सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत
अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत
शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या
हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या
हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या
शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा
राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.
1. गहू – 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल
हमीभाव असणार
2. मोहरीच्या किंमतीत – 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950
रूपये क्विंटल हमीभाव असणार
3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980
रूपये क्विंटल हमीभाव असणार
4. हरभऱ्याची किंमतीत – 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार
650 रूपये क्विंटल हमीभाव असणार
5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार
700 रूपये क्विंटल हमीभाव असणार
6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार
940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.