अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची
घोषणा होणार आहे. अशातच आता राजकीय घडमोडींना वेग
आला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं,
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
अशी इच्छा केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ आणि स्ट्राँग नेते आहेत. समाजाला
सत्तेत आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या पक्षाला
अद्याप राज्यात मान्यता नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक
विचार करावा. आम्ही एकत्र आलो तर समाजात उत्साह वाढेल.
प्रकाश आंबेडकर महायुती सोबत आले तर सत्तेत वाटा मिळेल.
त्यांनी महायुतीसोबत यावं. वैचारिक मतभेद असले तरी राजकीय
आघाड्या होतात. त्यांचा वंचितचा प्रयोग चांगला आहे. मात्र लोक
त्यांच्या सोबत येत नाहीत. त्यामुळे ते जर महायुतीसोबत आले तर
फायदा होईल, असं रामदार आठवले म्हणाले आहेत.
ऐक्याबद्दल त्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही. मात्र समाज
हितासाठी एकत्र यायला हवं. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात
काम करण्याची माझी तयारी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपाइंचे
अध्यक्ष व्हावं. माझा पाठिंबा त्यांना पाठिंबा आहे. बाबासाहेबांच्या
विचारांचा रिपाइं पक्ष आहे. त्यांची भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे.
मात्र आम्ही एकत्र आलो तर कुणासोबत जायचे याचा निर्णय घेता
येईल. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय इतर गट एकत्र आले तरी
फायदा होणार नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.
Read also: https://ajinkyabharat.com/relations-between-india-and-canada-deteriorated/