भारताने कॅनडातील आपले उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत
बोलावले आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात वर्मा आणि
इतर मुत्सद्दींचा सहभाग असल्याचा कॅनडाचा आरोप भारताने
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
ठामपणे फेटाळला आहे. भारताने हे आरोप निरर्थक आणि
राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र
मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाच्या उच्चायुक्तांनाही
बोलावून सांगण्यात आले आहे की कॅनडातील भारतीय उच्चायुक्त
आणि इतर मुत्सदी आणि अधिकाऱ्यांना निराधार लक्ष्य
करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे
की, अतिरेकी आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडाचे पंतप्रधान
टूडो सरकारच्या कृतींमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या कॅनडाच्या
सरकारच्या वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत
सरकारने उच्चायुक्त आणि इतर लक्ष्यित मुत्सद्दी आणि
अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध
अतिरेकी, हिंसाचार आणि फुटीरतावादाला टूडो सरकारच्या
समर्थनाविरोधात भारत पावले उचलू शकतो, असे कॅनडाच्या
उच्चायुक्तांना मंत्रालयाने सांगितले आहे. भारतीय मुत्सद्दींना
लक्ष्य करणे हा योगायोग नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/government-hints-at-half-way-announcement-of-elections/