देशात उपासमारीची ‘गंभीर’ समस्या
श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, बांग्लादेशपेक्षा वाईट स्थिती
नुकतेच समोर आलेल्या 19 व्या ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट
Related News
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...
Continue reading
आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरा
येथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती र...
Continue reading
अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्या
पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पथसंचलनाचे आयोजन केले होते.पथसंचलन पोस्टे जुने
शहर हद्द...
Continue reading
2024 मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. साधारण 127
देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 105 व्या स्थानावर
आला आहे. ज्यामुळे तो कुपोषण किंवा उपासमारीची ‘गंभीर’
समस्या असलेल्या देशांपैकी एक ठरला आहे. त्यातल्या त्यात
दिलासादायक बाब म्हणजे, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा
भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारत आपल्या शेजारी
देश श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि बांग्लादेश यांच्या मागे आहे,
तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या किंचित वर आहे. ग्लोबल
हंगर इंडेक्स अहवाल, कंसर्न वर्ल्डवाईड आणि वेल्थंगरहिल्फ यांनी
संयुक्तपणे जारी केला आहे, जो जगभरातील उपासमारीचा
मागोवा घेतो. हा अहवाल हे अधोरेखित करते की, या समस्येचा
सामना करण्यासाठी फारशी प्रगती न केल्याने, जगातील अनेक
गरीब देशांमध्ये उपासमारीची पातळी अनेक दशके उच्च राहील.
यंदाच्या अहवालात भारताचा 27.3 स्कोअर भूकची गंभीर पातळी
दर्शवितो. अहवालात अलिकडच्या वर्षांत भारतात कुपोषणाच्या
प्रमाणात किंचित वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी
2000 आणि 2008 मधील 38.4 आणि 35.2 च्या स्कोअरच्या
तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे. अहवाल पद्धती आणि सुधारित
डेटामध्ये बदल झाल्यामुळे 2023 च्या अहवालाशी त्याची तुलना
होऊ शकत नाही. गेल्या वर्षी 125 देशांपैकी भारत 111 व्या
क्रमांकावर होता आणि 2022 मध्ये भारत 121 देशांपैकी 107
व्या क्रमांकावर होता. तेव्हा भारत सरकारने हा अहवाल चुकीचा
आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते. भारत
कुपोषणाच्या समस्येशी झगडत आहे यात शंका नाही. 2000
पासून देशातील बालमृत्यू दरात सुधारणा झाली आहे, परंतु
बालकांचे कुपोषण हे एक गंभीर आव्हान आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एखादा देश जितका वरचा असेल तितकी
उपासमार कमी असेल असे मानले जाते. या आधारावर चीन,
चिली, कुवेत, रोमानिया, तुर्की, रशिया, जॉर्जिया, यूएई आणि
उझबेकिस्तानसह 22 देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.
म्हणजे या देशांमध्ये कमीत कमी उपासमार आहे. उपासमारीची
सर्वात चिंताजनक स्थिती सोमालिया, येमेन, चाड, मादागास्कर,
हैती आणि नायजर यांसारख्या देशांमध्ये आहे. ग्लोबल हंगर
इंडेक्समध्ये ते सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, 2024 च्या अहवालानुसार, 2016 पासून भूक कमी
करण्याची जागतिक प्रगती खुंटली आहे, ज्यामुळे 2030 पर्यंत
भूक निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठणे अशक्य झाले आहे. निर्देशांकात
समाविष्ट 127 देशांपैकी 42 देश उपासमारीच्या ‘चिंताजनक’
किंवा ‘गंभीर’ परिस्थितीचा सामना करत आहेत. हा अहवाल भूक,
हवामान बदल आणि लैंगिक असमानता यांच्यात थेट संबंध
प्रस्थापित करतो.
Read also: https://ajinkyabharat.com/omar-abdullah-will-take-oath-as-chief-minister-of-jammu-and-kashmir-on-october-16/