केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह
सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडे आगामी विधानसभा
निवडणुतीसाठी 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. रामदास
आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात
का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीत
जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना भाजप रामदास
आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडणार का?
ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “रिपब्लिकन पक्ष देशभर
वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त रिपब्लिकनच्या भरवशावर
आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव
झाला होता. त्यासाठी पक्ष वाढविण्याचा विचार बाबासाहेबांनी
व्यक्त केला होता. आमच्या रिपब्लिकन पक्षात मोठ्या प्रमाणात
गटबाजी मुरलेली आहे. एकेकाळी 9 खासदार होते. वंचित बहुजन
आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते माझ्यासोबत
आले असते तर जास्त मंत्री रिपब्लिकनचे असते. मी एकटाच मंत्री
झालो. पण एकमत होत नाही. त्यामुळे नुकसान होते. माझी इच्छा
आहे सगळे रिब्लिकन एकत्रित यावे”, असं आवाहन रामदास
आठवले यांनी केलं आहे. तसेच “प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या
माध्यमातून निवडणूक लढवली, पण त्यांचे उमेदवार निवडून आले
नाहीत. त्यांना मान्यता मिळाली नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर
यांनी मांडलं.
Read also: https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-untimely-rains-in-mumbai/