आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे
रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आज मोठा
राडा झालेला बघायला मिळाला. सकल हिंदू समाज आणि
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे
दाखवले. रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला
सकल हिंदू समाजाचा आणि भाजपचा तीव्र विरोध होता. त्यामुळे
पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या
उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पण वक्फ बोर्डाच्या
कार्यालयाच्या बाहेर उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय
सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे पोलीसही
सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदय
सामंत यांना आंदोलकांची गर्दी बघून कार्यक्रम उरकावा लागला.
उदय सामंत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाहेर आले, त्यावेळी
देखील आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी
रत्नागिरीत मोठा गोंधळ बघायला मिळला. मंत्री उदय सामंत
यांच्या हस्ते वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम
आज आयोजित करण्यात आला. पण भाजप आणि सकल हिंदू
समाजाचा या कार्यक्रमास विरोध आहे. त्यामुळे सकल हिंदू
समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून या विरोधात
निदर्शने दिली. यावेळी आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांनादेखील
काळे झेंडे दाखवले. उदय सामंत आले त्यावेळेला सकल हिंदू
समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी
केली. वक्फ बोर्डाचं कार्यालय रद्द करावं, अशी मागणी त्यांनी
केली.