JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारने भारतरत्न
पुरस्कार द्यावा, अशी मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
केली. बिहारमध्ये आज जदयूची राज्य कारकारिणीची बैठक होत
आहे. अशातच राजधानी पाटणा येथील जदयूच्या प्रदेश
कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आहे. नितीश कुमारांना भारतरत्न
देण्यात यावा अशी मागणी जदयूच्या सर्व नेत्यांच्या वतीने
करण्यात आली आहे. जदयूचे सरचिटणीस छोटू सिंह यांनी हे
पोस्टर लावले आहे. “नितीश कुमार यांनी जगभरात नाव कमावले
आहे. शीख समुदायाचे लोक नितीश कुमार यांचे कौतुक करतात.
अमेरिका असो, ब्रिटन असो वा कॅनडा, सर्वांनीच नितीश कुमार
यांच्या कामाचे कौतुक केले आहे. बिहारच्या विकासात त्यांनी
बजावलेल्या भूमिकेसाठी नितीश कुमार यांना भारतरत्न मिळावा”,
अशी मागणी असल्याचे सरचिटणीस छोटू सिंह म्हणाले. तसेच
आम्ही राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही आमच्या भावना व्यक्त
करू. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केलेले काम ऐतिहासिक
आहे. आम्ही आमच्या मागण्या भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान
यांच्यासमोर मांडू आणि गरज पडल्यास आम्ही दिल्लीत जाऊन
आमच्या मागण्या जोरदारपणे मांडू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जदयूसोबत बिहारमध्ये सरकारमध्ये असलेल्या भाजपने
देखील नितीश कुमार यांना भारतरत्न द्यायला हवा या मागणीला
पाठिंबा दिला. भाजपचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, जदयूने
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली,
यात चुकीचे काय आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत येऊन
जंगलराज असलेल्या बिहारमध्ये सुशासन प्रस्थापित केले. अंधारात
असलेल्या बिहारला प्रकाशात आणण्याचे काम केले. जिथे
चालण्यासाठी रस्ते नव्हते तिथे आमच्या सरकारच्या मदतीने पूल
आणि रस्ते बांधले. त्यामुळे या मागणीला आमचा कोणताही
आक्षेप नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/break-from-poharadevi-teerth-kshetrachya-vikasala-mavia-narendra-modi/