केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ
शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आहेत.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मान्यता दिलेल्या बहुतेक महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत
तसेच इमारतीपासून हॉस्टिल सुविधा नसतानाही याबाबतच्या अटी
पूर्ण करण्याच्या हमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना
मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी मुंबई व
नाशिक येथे ५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन वैद्यकीय
महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आता नव्याने केंद्र सरकारने
आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे राज्यात आता
एकूण ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असतील. शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची एकूण प्रवेश क्षमता ५०५०
एवढी असून नव्याने जागा वाढल्याने ती ५८५० एवढी होणार आहे.
अंबरनाथ, गडचिरोली, वाशीम, जालना, बुलढाणा, हिंगोली व
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १०० प्रवेश
क्षमतेसाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय
वैद्यकीय आयोगाच्या तपासणीत या महाविद्यालयांमध्ये पुरसे
अध्यापक तसेच इमारतीसह आवश्यक सुविधा नसल्यामुळे
मान्यता नाकारण्यात आली होती. मात्र राज्यातील आगामी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने
अटींची पूर्तता करण्याच्या हमीवर या आठ महाविद्यालयांना
मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये आर्थिकदृट्या मागासांना कोटा
निश्चित केल्यानंतर राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
९५० जागांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी
राज्यात आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असली तरी
केंद्रीय वैद्यकीय आयोगाच्या २०२० च्या किमान पात्रता निकषांची
पूर्तता या महाविद्यालयांनी केलेली नाही. पुरेसे मुनष्यबळ व
अध्यापक नाहीत तसेच इनारतींसह पायभूत सुविधांचा अभाव
असून लवकरात लवकर या अटींची पूर्तता केली जाईल या हमीच्या
आधारे या महाविद्यालयांना ही मान्यता देण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/yanda-padnar-kadakyaachi-thandi/