पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षा
जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र
मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या
भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली
असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार
पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान २०० लोकांचा
मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. दरम्यान आता भारतीय
दूतावासाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
नेपाळमध्ये महापूरात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी
भारताच्या दूतावासाने काही सूचना जारी केल्या आहेत. तसेच एक
हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी पूर
आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात
आहेत. तसेच दूतावास त्यांच्या सुरक्षित परतीसाठी व्यवस्था करत
आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट केले,
“नेपाळमध्ये विक्रमी पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठे
नुकसान झाले आहे. आमचे विचार प्रभावित झालेल्या सर्वांसोबत
आहेत. दूतावासाला काही अडकलेल्या नागरिकांची माहिती
मिळाली आहे. दूतावास यापैकी काही गटांच्या संपर्कात आहे
आणि त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करत आहे. अडकलेल्या
भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दूतावास नेपाळी
अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.” नेपाळमधील भारतीय
दूतावासाने मदतीसाठी इच्छुक लोकांसाठी आपत्कालीन क्रमांकही
जारी केले आहेत. नेपाळमध्ये राहणारे भारतीय नागरिक ज्यांना
मदतीची गरज आहे ते खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क
साधू शकतात ( सह): +९७७-९८५१ ३१६८०७ आपत्कालीन
हेल्पलाइन +९७७-९८५११ १७०२१, +९७७- ९७४९ ३३ २९२.