पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षा
जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र
मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या
भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली
असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार
पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान २०० लोकांचा
मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. दरम्यान आता भारतीय
दूतावासाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
नेपाळमध्ये महापूरात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी
भारताच्या दूतावासाने काही सूचना जारी केल्या आहेत. तसेच एक
हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी पूर
आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात
आहेत. तसेच दूतावास त्यांच्या सुरक्षित परतीसाठी व्यवस्था करत
आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट केले,
“नेपाळमध्ये विक्रमी पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठे
नुकसान झाले आहे. आमचे विचार प्रभावित झालेल्या सर्वांसोबत
आहेत. दूतावासाला काही अडकलेल्या नागरिकांची माहिती
मिळाली आहे. दूतावास यापैकी काही गटांच्या संपर्कात आहे
आणि त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करत आहे. अडकलेल्या
भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दूतावास नेपाळी
अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.” नेपाळमधील भारतीय
दूतावासाने मदतीसाठी इच्छुक लोकांसाठी आपत्कालीन क्रमांकही
जारी केले आहेत. नेपाळमध्ये राहणारे भारतीय नागरिक ज्यांना
मदतीची गरज आहे ते खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क
साधू शकतात ( सह): +९७७-९८५१ ३१६८०७ आपत्कालीन
हेल्पलाइन +९७७-९८५११ १७०२१, +९७७- ९७४९ ३३ २९२.