आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी
भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत
राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्या
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी,
याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने मंगळवारी संभाजीनगरमधील
पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद
लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागवून घेतली. यावेळी
पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद
पाकिटातून सोपविली.
उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे
बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गोवा आणि बिहारच्या
निवडणुकीत देखील भाजपकडून लिफाफा पॅटर्न राबवण्यात आला
होता. त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी
ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक
जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान
आमदारांना डच्चू दिला जाईल. तसे घडल्यास भाजप पक्षसंघटनेत
याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी
महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.
यावेळी एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होणार
आहेत. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय
घेतले होते. याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्याप्रमाणावर निर्णय
होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-5-october-rosie-maharashtra-dauriyavar/