देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण
होते. हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने
Related News
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
नदीजोड प्रकल्प हातात घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील अनेक
महत्वाच्या आणि मोठ्या नद्या एकमेकांना जोडून, दुशली भागात
त्यांचे पाणी वळवणे असा हा प्रकल्प आहे. दरम्यान आता याबाबत
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी भाष्य केले आहे.
भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर
करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी
उपलब्धता असावी यासाठी पुढील काही महिन्यांत देशातील २० नद्या
एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती
(जलसंसाधन) मंत्री सी. आर. पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले.
पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत
मुरवणे आवश्यक आहे. “हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची
भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले.
त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला. शुद्ध पाणी
घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी
झाला आहे, असे त्यांनी सांगितले. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती
मिळते आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे.
जगाच्या १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक
पाणी केवळ ४ टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशात पाण्याची पुरेशी उपलब्धता
असावी, यासाठी नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रत्येकाला पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशा विश्वास पाटील
यांनी व्यक्त केला आहे.