मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात
दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या
दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य
पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले
आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची
चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी
सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर
सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी
सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा
आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील
इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय
मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची
दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी
डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो
होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत
खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची
विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव
तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना
पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी
तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं
आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/public-meeting-in-sharad-pawaranchi-chiplun/