महाराष्ट्र केसरी फायनल 2026 : सिकंदर, महेंद्र, हर्षवर्धन आणि जय पाटील यांची थरारक सामना

महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी २०२६ चा अंतिम फेरीचा थरार आज पूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींसाठी खुलणार आहे. पुण्यातील वाघोली येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अंतिम फेरीत माती व गादी विभागातील धडधाकेबाज मल्ल आपले जलवे दाखवणार आहेत. यंदा माती विभागामध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड, तर गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात भयंकर लढती होणार आहेत.

माती विभागामध्ये उपांत्य फेरीत हिंगोलीचा चपळ मल्ल सिकंदर शेखने अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर ४-३ ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे सोलापूरचा बलदंड मल्ल महेंद्र गायकवाडने रविराज चव्हाणवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत सिकंदरसोबत आमनेसामने येणार आहे. दोघेही मल्ल तुफानी असून, एक चपळ तर दुसरा बलदंड, त्यामुळे माती विभागात कोण बाजी मारेल हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ मध्येही या दोघांमध्ये अंतिम फेरीत सामना झाला होता; तेव्हा महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले, पण पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.

गादी विभागातही प्रतिस्पर्धा तितकीच रोमांचक आहे. हर्षवर्धन सदगीर हा अनुभवी मल्ल असून, २०२० च्या महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये त्याने वेताळ शेळकेवर विजय मिळवला होता. तर सोलापूरचा जय पाटील आपल्या धडाडीच्या खेळामुळे पहिल्या फेरीपासूनच सर्वांना प्रभावित करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत जयने पुण्याचा महाराष्ट्र केसरी मानकरी पृथ्वीराज मोहोळ फक्त ३६ सेकंदात चितपट करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे हर्षवर्धन आणि जय पाटील यांच्यातील सामना अनुभव आणि ताकद या दोन्ही घटकांनी भरलेला असणार आहे.

Related News

या अंतिम फेरीत माती व गादी विभाग दोन्हीमध्ये प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र केसरी २०२६ चा किताब कोण जिंकणार, सिकंदर, महेंद्र, हर्षवर्धन किंवा जय यापैकी कोण बाजी मारेल, हे काही तासांतच स्पष्ट होईल. या वर्षी जय पाटील आणि महेंद्र गायकवाड यांना पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याची संधी आहे, तर हर्षवर्धन आणि सिकंदर यांचे अनुभव आणि ताकद पाहायला मिळेल. कुस्तीप्रेमींमध्ये या फायनलसाठी उत्सुकता चरमशिखरावर आहे.

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रेक्षकांना सहा मिनिटांच्या थरारक सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे सर्वांसाठी मनोरंजक ठरणार आहे. या वर्षी माती विभागात सिकंदर व महेंद्र, तर गादी विभागात हर्षवर्धन व जय यांची सामना प्रेक्षकांना मोठा उत्साह देणार आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/ashok-kharat-case-hatachi-botan-tantra-mantra-anamika-and-demand-of-maharashtra-superstition-eradication-committee/

Related News