राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज
जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे
यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली.
मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण
करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे
17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या
आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे
पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा
निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी
महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी
आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब
दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता.
मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार
उभे करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे
घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील
हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर
भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
Read also: https://ajinkyabharat.com/ramayanat-ranbir-kapoor-sakarnar-role-of-prabhu-ram-and-parshuram/