आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.
राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले
आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
मोडवर आले आहे. गेल्या महिन्याभरापासून अजित पवार हे
जनसन्मान यात्रेत व्यस्त आहेत. त्यातच आता अजित पवारांनी
एक मोठं वक्तव्य केले आहे. “दुसरा आमदार मिळाला तर
दोघांच्या कामाची तुलना करा. यंदाची निवडणूक बारामतीकरांच्या
भवितव्याची”, असे अजित पवारांनी म्हटले.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या बारामतीत आहे.
यानिमित्ताने अजित पवारांनी दणदणीत भाषण केले. या
भाषणावेळी अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकांबद्दल एक मोठं
वक्तव्य केले. तसेच त्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा घेतला.
“पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका
घेऊ नका. काही चूकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ
आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा”,
असा सल्लाही अजित पवारांनी दिला.
“तुम्ही लाईटली घेऊ नका. आपण केलेला विकास मतदारांना
सांगा. घड्याळाने ही कामे केली सांगा. आपण आपल्या टर्मपुरती
कामं केलेली त्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे. ही निवडणूक
महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आणि बारामतीकरांच्या भवितव्याची
निवडणूक आहे. पाच वर्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे परिणाम होणार
आहे त्याची निवडणूक आहे. आपण सत्तेत असू तर काही करता
येणार आहे”, असेही अजित पवार म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/like-many-things-lalbaghcha-rajahi/