मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे
पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि
कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे
आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे
यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात
मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी
आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या
न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत,
मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार
असल्याचं म्हटलं आहे. आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन
करनार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने
बैठका घेणार असल्याचंही त्यानी जाहीर केलं आहे. मतदार संघानिहाय
बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे
घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं.
लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती
झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि
पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते,
आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असेही जरांगे यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/work-starts-and-stops-during-udya-maharashtra-bandh/