‘लखपती दीदीं’ना करणार प्रमाणपत्रांचे वाटप
केंद्राच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना
प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
महिला मेळाव्याला संबोधित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी
25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी काही लाभार्थींना शहराच्या सीमेवर असलेल्या जळगाव विमानतळाजवळील
कार्यक्रमाच्या मैदानावर आमंत्रित केले जाणार आहे.
या ठिकाणी त्यांना कार्यक्रमादरम्यान प्रमाणपत्रे दिली जातील,
तर इतरांना त्यांच्या गावात प्रमाणपत्रे दिली जातील. या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस व अजित पवार
हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण
विकास मंत्रालयाने आयोजित केला आहे.
यावेळी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा एक फिरता निधी- कम्युनिटी
इन्व्हेस्टमेंट फंड जारी करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या (SHGs) सुमारे
48 लाख सदस्यांना फायदा होईल. यावेळी पंतप्रधान 5000 कोटी रुपयांचे
बँक कर्ज देखील जारी करतील, ज्यामुळे 2,35,400 बचत गटांच्या (SHGs)
25.8 लाख सदस्यांना फायदा होईल.
लखपती दीदी या अशा महिला आहेत ज्या वार्षिक 1 लाख किंवा त्याहून अधिक कमावतात.
या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढले नाही,
तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत.
ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दिदी तयार केल्या आहेत.
आता सरकारचे लक्ष्य पुढील 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे.
दरम्यान, पीएम मोदींच्या या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री
गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन, या मार्गावरील वाहतूक वळविण्याचे
नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किलोमीटर क्षेत्र,
22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट नो ‘नो फ्लाईंग झोन’ असणार आहे.
यासह 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत
व्यावसायिक उड्डाणे राहणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarangenshi-discussion-with-prithviraj-chavan/