अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे नागरिक संतप्त
बदलापूर येथे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मंगळवारी
(२० ऑगस्ट) बदलापूर येथे मोठे आंदोलन उभे राहिले.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
काहीशी अशीच परिस्थिती आसाममधील शिवसागर शहरात पाहायला मिळाली.
याठिकाणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे
मोठा संघर्ष निर्माण झाला. मुलीचा विनयभंग करणारा आरोपी हा
मारवाडी समाजातील असल्यामुळे शहरात बाहेरचे विरुद्ध आसामी असा
संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. आसामच्या उल्फा या अतिरेकी संघटनेने
मारवाडी समाज बाहेरचा असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले.
त्यानंतर मारवाडी समाजाने कॅबिनेट मंत्र्यासमोर गुडघे टेकून माफी मागितली.
सदर प्रकरण १३ ऑगस्ट रोजी घडले. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक
करून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
दोन्ही आरोपी हे स्थानिक व्यापारी समुदायाचे असल्यामुळे या घटनेचे पडसाद
स्थानिक विरूद्ध बाहेरचे अशा स्वरुपात पाहायला मिळाले. शहरात बहुतेक दुकाने
ही मारवाडी समाजाची आहेत. त्याचाही राग यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
आसामी राष्ट्रवादी संघटनेच्या ३० कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केल्यामुळे
बिगर आसामी व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली. या आंदोलनानंतर राज्याचे
कॅबिनेट मंत्री आणि शिवसागर जिल्ह्याचे पालकमंत्री रनोज पेगू यांनी आसामी
राष्ट्रवादी संघटना आणि मारवाडी समूहाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत
मारवाडी समाजाचे पुरूष आणि महिलांनी संघटनेची यांची माफी मागितली. तसेच
माध्यमांसमोर जाहीर दिलगिरीहीव्यक्त केली. त्यानंतर आंदोलकांना पान खायला देऊन प्रकरण मिटवले.
Read also: https://ajinkyabharat.com/ujjwal-nikam-ladhanar-of-badlapur-atrocities-case/