राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि
विधानसभा निवडणूका जवळ येत असल्याचा अंदाज आल्यानंतर
राज्यातील राजकीय घटनांना वेग आला आहे. विधानसभेसाठी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट
घेताना दिसून येत असताना आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे
यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा आरक्षण आंदोलक लवकरच
मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरक्षण न मिळाल्याने
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं
जरांगे सांगत आहेत. दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून
इच्छूकांसह अनेक नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत. आज सर्वाधिक
बदली होणारे सनदी अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांचे
बंधू अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी आज
अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत.
गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं बोलल जातेय ,
जरांगे पाटील आणि अशोक मुंडे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली.
दरम्यान अशोक मुंडे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर
यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली होती. लोक महायुतीला कंटाळल्याचं बोललं जातंय.
राज्यातील गोरगरिब महायुतीला कंटाळल्याचं ते म्हणाले होते.
आम्ही महाराष्ट्रात नवं समिकरण घडवून आणत असल्याचं ते म्हणाले होते.