राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि
विधानसभा निवडणूका जवळ येत असल्याचा अंदाज आल्यानंतर
राज्यातील राजकीय घटनांना वेग आला आहे. विधानसभेसाठी
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट
घेताना दिसून येत असताना आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे
यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा आरक्षण आंदोलक लवकरच
मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरक्षण न मिळाल्याने
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं
जरांगे सांगत आहेत. दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून
इच्छूकांसह अनेक नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत. आज सर्वाधिक
बदली होणारे सनदी अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांचे
बंधू अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी आज
अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत.
गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं बोलल जातेय ,
जरांगे पाटील आणि अशोक मुंडे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली.
दरम्यान अशोक मुंडे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर
यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली होती. लोक महायुतीला कंटाळल्याचं बोललं जातंय.
राज्यातील गोरगरिब महायुतीला कंटाळल्याचं ते म्हणाले होते.
आम्ही महाराष्ट्रात नवं समिकरण घडवून आणत असल्याचं ते म्हणाले होते.