राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि
विधानसभा निवडणूका जवळ येत असल्याचा अंदाज आल्यानंतर
राज्यातील राजकीय घटनांना वेग आला आहे. विधानसभेसाठी
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट
घेताना दिसून येत असताना आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे
यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा आरक्षण आंदोलक लवकरच
मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरक्षण न मिळाल्याने
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं
जरांगे सांगत आहेत. दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून
इच्छूकांसह अनेक नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत. आज सर्वाधिक
बदली होणारे सनदी अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांचे
बंधू अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी आज
अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत.
गेवराई मतदार संघातून ते इच्छुक असल्याचं बोलल जातेय ,
जरांगे पाटील आणि अशोक मुंडे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली.
दरम्यान अशोक मुंडे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांची राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर
यांनीदेखील जरांगे यांची भेट घेतली होती. लोक महायुतीला कंटाळल्याचं बोललं जातंय.
राज्यातील गोरगरिब महायुतीला कंटाळल्याचं ते म्हणाले होते.
आम्ही महाराष्ट्रात नवं समिकरण घडवून आणत असल्याचं ते म्हणाले होते.