उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात
जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार
जाहीर करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या युतीत असताना
आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको.
आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत
जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री,
असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो.
तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो
आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात
युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
तसेच, यावेळी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे
धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला.
त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच
संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला.
या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं.
ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर
बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-fumio-kishida/