पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे
पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे
रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी
मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी
सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला.
एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं.
कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून ही मालगाडी जात होती.
यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अभियांत्रिकी समस्येमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल.
कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की,
घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नाही.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/100-bjp-mps-met-pm-modi/