गोदावरी नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ
मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये
पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत
Related News
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर Dipika Kakkar चे भावनिक मनोगत
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dipika Kakkar इब्राहिम सध्या आयुष...
Continue reading
राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने 1989 बॅचच्या आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांना राज्याचा मुख्य स...
Continue reading
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन मार्गिकांमुळे शहरभर कनेक्टिव्हिटी मजबूत
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी गती देणाऱ्या मेट्रो फेज-2 प्रकल्पाला अखे...
Continue reading
रणदीप हुड्डा–लिन लाईश्रम यांच्या दुसऱ्या लग्नवाढदिवशी गोड बातमी; पहिल्या अपत्याची चाहत्यांना आनंदवार्ता
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्र...
Continue reading
भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
Continue reading
रात्री झोप येत नाही? मन सतत विचार करतंय? प्रेमानंद महाराजांचा सोपा उपाय जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना रात्री शांत झोप मिळत ना...
Continue reading
आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: रोज आहारात Beans चा समावेश का करावा?
Beans : आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहार घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकदा लोक महागड्या सुपरफूड्सकडे वळता...
Continue reading
Air Quality in Mumbai Has Seriously Deteriorated: इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
रोज रात्री Ajwain Waterपिल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या 1 महिन्याचा अनुभव
Ajwain Water : अनेक घरांमध्ये आरोग्यविषयक काळजी ही आजही आजी-आज...
Continue reading
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट मोठी घोषणा
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘
Continue reading
टाकळी बु : अकोला-वाशिम जिल्हा बँकेवर विजय म्हैसने यांची प्रतिनिधी म्हणून निवड
अकोट तालुक्यातील टाकळी बु सेवा सहकारी सोसायटीतील विशेष सभेत विजय रमेशराव म...
Continue reading
‘रामायण’साठी नॉनव्हेज सोडलं म्हणणारा रणबीर कपूर अडचणीत; ‘जंगली मटण’चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांचा जोरदार संताप
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या दो...
Continue reading
वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा
विसर्ग करण्यात आला. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता 14 टक्क्यांवर
पोहचला आहे. काल झालेल्या पाण्याच्या विसर्गाआधी जायकवाडीचा पाणीसाठी 4 टक्क्यांपर्यंत घसरला होता.
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील
पाणीसाठा झपाट्याने वाढतोय.पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
परिणामी नाशिकमध्ये पाऊस असचा सुरू राहिला तर, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात
आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड,
निळवंडे, गंगापूर, ओझरवेर, दारणा, भावली कडवा, नागमठाण, नांदूर मध्यमेश्वर,
भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये
सध्या पाण्याचे आवक वाढली आहे. सध्या जायकवाडी धरणात जवळपास
20 हजार क्युसेक्स आवक सुरू आहे. सध्याचा जायकवाडी धरणातील पाणीसाठा
पाहता पुढील 8 महिने पिण्यासाठी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.
नाशिक शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे
काल रविवारी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.
परिणामी, गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
रविवारी दुपारी 12 वाजता धरणातून 500 क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
दुपारी 3 वाजता 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात
येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.