केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन
अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
“विरोधकांना हवं ते म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. २०२९ मध्ये
पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही
असं म्हणणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल”
असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
“दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला.
काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
तसेच देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे.
भविष्यातही लोक त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील”
असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
गृहमंत्र्यांच्या चंदीगड दौऱ्यादरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी
आशिष गजनवी यांना ताब्यात घेतलं होतं. गजनवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सकाळी साडेसहा वाजता पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना सोबत येण्यास सांगितलं,
पण ते गेले नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं.
गजनवी आणि त्यांची टीम नेहमीच गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करत आहे.
हे लक्षात घेऊन यावेळी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
मनीमाजरा पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन अमित शाह यांनी केलं.
यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
याचा फायदा परिसरातील एक लाखाहून अधिक लोकांना होणार आहे.
‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत, सतत उच्च दाब पुरवठ्याद्वारे पाण्याचा साठा कमी करून
अपव्यय रोखणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
याशिवाय अमित शाह यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/wrote-a-letter-to-rajnath-singh-demanding-to-stop-giving-arms-to-israel/