विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना
यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारल्याने शनिवारी पुन्हा तणाव निर्माण झाला
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
आणि आंदोलकांनी राजधानी ढाक्याच्या मुख्य रस्त्यांना घेराव घातला.
आरक्षणविरोधी आंदोलनात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर
काही दिवसांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
बांगलादेशात अलीकडेच वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी
पोलिस आणि प्रामुख्याने विद्यार्थी आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी पाहायला मिळाल्या.
1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात लढलेल्या माजी सैनिकांच्या नातेवाईकांना
या कोटा प्रणाली अंतर्गत सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले होते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांनी ढाक्याचे प्रमुख रस्ते अडवले,
त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अधिका-यांनी सांगितले की,
शहरातील विविध ठिकाणी आंदोलकांनी रॅली काढल्याने
सुरक्षा दलांना कडक पहारा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शुक्रवारी पंतप्रधान हसीना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमधील
कोटा प्रणालीवरून हिंसाचार संपवण्यासाठी चर्चेसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी
गणभवन येथे भेटण्याचे आवाहन केले होते.
शुक्रवारी पुन्हा निदर्शने सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला आणि
100 हून अधिक जखमी झाले. राजधानी ढाक्याच्या काही भागांमध्ये
2,000 हून अधिक निदर्शक जमले होते, त्यापैकी काहींनी नारे देत पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/resolution-for-change-in-murtijapur-assembly-constituency/