देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी
२५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे.
ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी,
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
अशी मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरूवारी केली.
राज्यसभेत शून्य प्रहरावेळी चड्ढा यांनी संबंधित मुद्दा उपस्थित केला.
देशातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे इतके आहे.
भारत जगातील सर्वांत तरूण देशांपैकी एक आहे,
याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा
कमी वयाचे आहेत. ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे.
देशात पहिल्या लोकसभेत निवडून गेलेले २९ टक्के सदस्य ४० वर्षांपेक्षा
कमी वयाचे होते. मात्र, मागील लोकसभेतील केवळ १२ टक्के खासदार
त्या वयोगटातील होते. आपला तरूण देश ज्येष्ठ राजकारणी असलेला आहे.
आपण तरूण राजकारण्यांचा तरूण देश बनण्याची आकांक्षा बाळगायला हवी.
आपल्या देशात राजकारणाला बॅड प्रोफेशन मानले जाते.
मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट बनावे असे पालकांना वाटते.
मुलांनी राजकारणी बनावे असे कुणालाच वाटत नाही.
राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.