नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास
सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि
बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे,
असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
नाव बदललं की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत,
असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं
सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे.
अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही,
असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील दोन शहरांची नावं बदलल्याच्या विरोधातील
याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
नाव बदलणं हा राज्य सरकारचा अधिकार आहे.
त्यासाठी, न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही.
हायकोर्टानं तुमचं म्हणणे ऐकून घेऊन सविस्तर आदेश दिले आहेत.
त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
यापूर्वी 8 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबादचं नाव बदलून
छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा
राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.
हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
आता सर्वोच्च न्यायालयानंही त्यास मान्यता दिली आहे.
त्यामुळे आता औरंगाबादचं ना छत्रपती संभाजीनगर
आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव कायम राहणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/majha-jeev-gelawar-chief-minister-will-take-action-amol-mitkari/