पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात
माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का?
अमोल मिटकरींचा संतप्त सवाल
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस
पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या
कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात.
त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते.
माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार
आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली.
एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही.
माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का,
असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.
ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे आणि
अकोला पोलिसांवर टीकेची तोफ डागली. राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुनशी लोक
महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही.
कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का?
त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही.
कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही.
पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात.
गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे,
असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/attack-of-jitendra-awhads-gadivar-sambhajirajs-swarajya-sangathan/