काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये
महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
विधानसभा निवडणुकांची तयारी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभेला
काँग्रेस पक्षाला तब्बल 13 जागांवर विजय मिळाला.
गत 2019 च्या तुलनेत काँग्रेस 1 जागेवरुन 13 जागेवर पोहोचल्याने
पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यातही नाना पटोले यांना यश मिळालं आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकांही काँग्रेसने नाना पटोले यांच्याच नेतृत्वात
निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जाणार आहेत.
त्यामुळे, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांवर काँग्रेस,
शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहे.
कॉँग्रेसने महाविकास आघडीतील या समन्वयासाठी 10 जणांची समिती नेमली आहे.
तर, मुंबईसाठी या समितीत 3 नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत
जागा वाटपासाठी काँग्रेसने 10 सदस्यांची समिती गठीत केली आहे.
त्यामध्ये, महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 7 जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट
आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे.
त्यामुळे, महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सुत्र ठरवण्यासाठी
राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुढाकार घेणार आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने या चर्चांसाठी
दिल्लीतून वरिष्ठ नेते प्रत्यक्ष दरवेळी येऊ शकत नाही.
त्यामुळेच, काँग्रेसने महाराष्ट्रात 10 नेत्यांची समिती नियुक्त केली आहे.
त्यामध्ये, जुन्या व वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
तर, मुंबईसाठी मुंबईतील तीन प्रमुख नेत्यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/india-navvyanda-woman-ashiya-kapchayas-last-journey/