चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी आज उत्तर प्रदेशातील गोंडा येथे उलटल्या.
या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी
या अपघाताची दखल घेतली आहे.
मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
गोंडा-गोरखपूर रेल्वे मार्गावर मोतीगंजच्या पिकौरा गावाजवळ हा अपघात झाला.
चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी उलटल्या. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे.
जखमींना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
गोंडा येथे झालेल्या रेल्वे अपघाताची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून
मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर
योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लखनौ आणि बलरामपूर येथून प्रत्येकी एक एनडीआरएफ टीम
गोंडा येथे पाठवण्यात आली आहे. रेल्वे अपघातात बचावकार्यासाठी
5 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून घटनास्थळी
आणखी रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
मदतकार्य जलद करण्यासाठी तीन जिल्ह्यांतून एसडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे.