चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी आज उत्तर प्रदेशातील गोंडा येथे उलटल्या.
या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी
या अपघाताची दखल घेतली आहे.
मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
गोंडा-गोरखपूर रेल्वे मार्गावर मोतीगंजच्या पिकौरा गावाजवळ हा अपघात झाला.
चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी उलटल्या. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे.
जखमींना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
गोंडा येथे झालेल्या रेल्वे अपघाताची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून
मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर
योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लखनौ आणि बलरामपूर येथून प्रत्येकी एक एनडीआरएफ टीम
गोंडा येथे पाठवण्यात आली आहे. रेल्वे अपघातात बचावकार्यासाठी
5 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून घटनास्थळी
आणखी रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
मदतकार्य जलद करण्यासाठी तीन जिल्ह्यांतून एसडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे.