मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे.
त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे.
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि
मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे.
परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही.
अजून तीन-चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल,
असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या घाट विभागात वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा
दिल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातील अमरावती आणि
चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारलेली आहे.
पण त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावलेली पाहायला मिळत आहे.
वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल.
मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यासाठी वेळ लागेल.
खरंतर यंदा अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास वेगाने झाला होता.
केरळमध्येदेखील दोन दिवसांपूर्वी हजेरी लावली.
त्यानंतर मॉन्सून महाराष्ट्रात ६ जून रोजी दाखल झाला,
तर ८ जून रोजी पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या काही भागात पोहोचला.
९ जून रोजी मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बहुतांश भागात मजल मारली.
आता तर मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे.
विदर्भामध्ये बुधवारी (दि. १२) पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात
मॉन्सून पोहोचला होता, १४ जूनपर्यंत वाटचाल सुरू होती.
पण दोन दिवसांपासून ती मंदावलेली आहे.
सध्या बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याचे दिसून येत आहे.
त्यातच अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल मंद झाली आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून पुढे वाटचाल करण्यासाठी
पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट !
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह
पावसाचा अंदाज आहे.
१७ ते १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे,
नांदेड वगळता सर्व मराठवाडा,
सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाट विभागात देखील येलो अलर्ट आहे.
Read also: पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात. (ajinkyabharat.com)