तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंडी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अमित शाह आणि जेपी नड्डा या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळीच हैदराबादला पोहोचले आहेत.
मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील
ए. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये टीडीपीसह एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत टीडीपी आणि एनडीएच्या आमदारांनी
चंद्राबाबू नायडू यांची नेता म्हणून निवड केली.
यानंतर एनडीए नेत्यांच्या विनंतीनंतर राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी मंगळवारी चंद्राबाबू नायडू
यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी राजभवनात राज्यपालांची यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.
चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत इतर नेतेही शपथ घेण्याची शक्यता आहे.
ज्यामध्ये जनसेना प्रमुख पवन कल्याण आणि ज्येष्ठ नेते एन. मनोहर,
नायडू यांचे पुत्र नारा लोकेश
आणि टीडीपी आंध्र प्रदेशचे नेते अचेन नायडू यांचा समावेश आहे.
पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
चंद्राबाबू नायडूंच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील.
यामध्ये टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ आणि भाजपचे २ मंत्री असणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या
आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता.
आंध्र प्रदेश विधानसभेत १७५ जागा आहेत.
या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार,
अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार आणि भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत.
Read also : लडाखच्या अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा (ajinkyabharat.com)