गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे…
ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर
Related News
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
Nashik MLC Crisis: महायुतीत खळबळ! महाजन-सामंत भेट टाळल्याने 10 प्रश्न अनुत्तरित
Nashik MLC Election 2026: महाजन-सामंत यांच्यातील दुरावा की राजकीय र...
Continue reading
के. अण्णामलाईंच्या नव्या पक्षाला 9.97 लाख समर्थक; दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा?
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून भारतीय जनता पक्षासाठी ही परिस्थिती चिंताजन...
Continue reading
संजय राऊत यांची नितेश राणेंवर 5 दमदार शब्दांत स्तुती; राजकारणात मोठी खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि शाब्दिक चकमकी ...
Continue reading
राज्यसभेच्या जागेवर मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादी भाजपसाठी जागा सोडणार? 4 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राज्यसभ...
Continue reading
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: 2 संकटमोचकही ठरले अपयशी! शिंदे सेनेसाठी मोठा धक्का, वाढलं टेन्शन
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026 : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभ...
Continue reading
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
Continue reading
15.15 लाख कोटींचा कथित घोटाळा! LIC ने राजेश मेहतांच्या कंपनीत गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांचा स्फोटक सवाल
देशातील आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा ...
Continue reading
उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची सूचक पोस्ट; ‘Revenge’ संदेशामुळे राजकीय चर्चांना उधाण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क...
Continue reading
ममता बॅनर्जींसमोर मोठे राजकीय संकट? तृणमूलमधील बंडामुळे भाजपच्या ‘मिशन 362’ ला नवे बळकोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ...
Continue reading
‘तुमच्या देशात जाऊन डान्स करा’; कॅनडातील भारतीय महोत्सवावरून वाद, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप
कॅनडातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आलेल्या ...
Continue reading
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व
निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने
राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून
सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार?
आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.
निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले.
तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी
निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.
विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा
निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत.
त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे,
खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे.
निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.
Read Also https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/