गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे…
ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व
निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने
राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून
सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार?
आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.
निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले.
तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी
निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.
विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा
निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत.
त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे,
खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे.
निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.
Read Also https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/