काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपा 298 जागांवर आघाडीवर असली तरी बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. अशातच भाजपाच्य साथीला असलेले व कोणत्याही क्षणी या गोटातून त्या गोटात उड्या मारू शकणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमा आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबु नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
यामुळे या दोघांचा संपर्क करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या असून या दोघांना चांगली ऑफर आली तर ते इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा 28 ते 30 च्या आसपास आहेत. जर भाजपाला काठावर बहुमत मिळाले तर हे दोघेच किंगमेकर ठरणार आहेत. अशात ते काँग्रेससोबतही जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केल्या जात अहे. गेल्या काही काळापासून नितीशकुमार हे एनडीएच्या प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काल नितीशकुमारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सर्व प्रमुख पक्षांची राजकीय रणनीती वेगाने बदलू लागली आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला गुंतागुंतीच्या वाटाघाटी आणि धोरणात्मक आघाड्या बांधण्याची गरज आहे. तर काँग्रेसला या दोघांना फोडले तर सत्तेत जाण्याची संधी खुणावत आहे. यामुळे या दोघांशी काँग्रेस नेत्यांकडून संपर्क करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाराष्ट्रात उलथापालथ
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील 30 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असून 17 जागांवर महायुतीने आघाडी घेण्यात यश मिळवले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने मताधिक्य घेतले आहे. महाराष्ट्रात काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Related News
राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
बाकीचे ...
Continue reading
नाथवाना (राजस्थान) – भारतमाला एक्सप्रेस हायवेवरील नाथवाणा रेस्ट एरियाजवळ
सोमवारी सकाळच्या सुमारास ज्वलनशील रसायनाने भरलेला टँकर उलटल्याची घटना घडली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल...
Continue reading
हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
...
Continue reading
अकोला | १३ एप्रिल २०२५
गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार
मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम...
Continue reading
राखोंडे परिवारा कडुन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना थंड पाण्याचे वितरण व आयोजन
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती बहु.
...
Continue reading
दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल-2 (T2)
सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात देखभाल व सुधारणा कामांमुळे बंद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे इं...
Continue reading
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी आजपासून (15 एप्रिल) नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
यावर्षी यात्रेचा कालावधी 3 जुलै ते 9 ऑगस्ट (रक्षाबंधन) असा 39 दिवसांचा असून,
सुमारे 6 ल...
Continue reading
तक्रार केल्यावर पोलिसांनी पीडितेलाच फटकारलं, व्हिडिओ व्हायरल
अलिगढ (उत्तर प्रदेश) – देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या
उत्साहात साजरी केली जात असताना, उत्तर प्रदेशमधी...
Continue reading
फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना.
मंगरूळपीर : आपल्या समाजातील कार्यक्षम भगिनी व बांधवांनी उद्योग क्षेत्रामध्ये आले पाहिजे,
आम्ही डिक्की या दलित उद्योजक संघटनेमा...
Continue reading
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन या खासगी
अंतराळ संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-31 अंतर्गत,
जेफ बेझोस यांची मंगेतर लॉरेन सांच...
Continue reading
वाराणसी |
लखनऊ: वाराणसीमध्ये १९ वर्षीय युवतीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक
बलात्कार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर शासनाने मोठी कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोद...
Continue reading
खामगाव |
15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळी
साडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.
मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक ...
Continue reading