चान्नी – जय बजरंग युवक मंडळाच्या वतीने संचालित
जय बजरंग कला महाविद्यालयात ‘एन.ई.पी. २०२० – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रवास पाच वर्षांचा,
सामूहिक चिंतन – आकार भविष्याचा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ व
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या
कार्यशाळेत प्राचार्य प्रा. निवृत्ती वरखेडे यांच्या अध्यक्षतेखाली
प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन धोरणाची सखोल माहिती दिली.
डॉ. ममता इंगोले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चे उद्दिष्ट, अंमलबजावणी,
क्रेडिट्स वितरण, मूल्यांकन पद्धती व पदवी अभ्यासक्रमातील विषय निवडीसंबंधी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना कौशल्यप्रधान, रोजगाराभिमुख व स्वावलंबी बनविणे हा धोरणाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचा निरसन करण्याची संधी घेतली.
संस्थेचे सचिव श्री. गजाननभाऊ इंगळे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी एकरूप राहण्याचे आवाहन केले.
प्राचार्य प्रा. निवृत्ती वरखेडे यांनी कार्यशाळेतील माहितीपूर्ण व्याख्यानाबद्दल डॉ. इंगोले यांचे कौतुक केले.
या कार्यशाळेत शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
ज्यामुळे धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
read also :https://ajinkyabharat.com/musadhar-pavasamue-udya-akot-akola-demu-railway-service-canceled/