शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप पक्षाचे
अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप बसू यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी एसआयटी चौकशी जाहीर करण्यात आली आहे.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरते संत नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जी बसू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.
फोटोशॉपने बनावट सातबारा, नोंदी वाढवणे, खरी शेतकरी वगळणे, अशा गंभीर प्रकारांमुळे खऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही,
असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे निखिल गावंडे यांनी केला आहे.
ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला ठेवून, ज्वारी न पेरलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने खरेदी दाखवून शासनाच्या हमीभाव
योजनेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. रामेश्वर साबळे यांच्यासारख्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांकडे कमी भावाने ज्वारी विकावी लागली.
या प्रकरणावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आवाज उठवला
आणि मंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष कुलदीप बसू यांनी सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय हेतूने प्रेरित प्रकरण असल्याचा दावा केला आहे.
मात्र, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरीहितवादी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वावर फसवणुकीचे आरोप होणं,
ही पक्षाच्या प्रतिमेसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.