इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,

इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,

इंझोरी | प्रतिनिधी

इंझोरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झाले आहेत. अति पावसानंतर आता

रिमझिम पावसामुळे २०० एकरांवर दुबार पेरणी खोळंबली असून शेतकरी अक्षरशः

Related News

आसमानी आणि सुलतानी संकटात सापडले आहेत.

यावर्षीच्या सुरुवातीला अति पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली पहिली पेरणी फसली. बियाणे उगवलेच नाहीत,

त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. काहींनी बैलजोडीच्या साहाय्याने कसाबसा दुबार पेरणीचा प्रयत्न केला,

पण मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे ती पेरणीही अडकली आहे.

अतिओलाव्यामुळे जमिनीत केलेली पेरणी पुन्हा उगवेल का? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने आशेवरच ते तिसऱ्यांदा पेरणी करण्याचा विचार करत आहेत,

मात्र खर्च वाढला असून हमीभाव, विमा आणि शासनाची मदत मिळेल की नाही, याविषयीही संभ्रम कायम आहे.

“बियाणं, खतं, मजुरी आणि बैलांची मेहनत यावर शेतकरी तिसऱ्यांदा खर्च करत आहे,

पण निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचं जगणंच संकटात आलं आहे,” अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.

या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शासनाने पंचनामे करून

आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/patur-firekhed-rastyavar-trector-overturned/

Related News