एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!

एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!

बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक

पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत आहोत याच्याकडे लक्ष न देता एक

फॅशन म्हणून याचा वापर केला जात आहे हे थांबविण्यासाठी आज दिनांक 7 जुलै रोजी वाडेगांव ग्राम पंचायत

Related News

च्या वतीने प्लॅस्टीक कचरा निर्मूलनासाठी सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी सर्व सदस्य तसेच

सर्व कर्मचारी तथा गावकरी लोकांना सोबत घेऊन प्लॅस्टीक कचरा निर्मूल करण्यासाठी सुरूवात केली आहे.

कारण प्लॅस्टीक कचर्यामुळे खुप नुकसान होत आहे. म्हणुन प्रत्येक गावातील नागरीकांनी प्लॅस्टीक कचरा इतरत्र

न यकता ग्राम पंचायत च्या कचरा निर्मूल गाडीत टाकावा जेने करून त्या प्लॅस्टीक कचर्याची योग्यरितीने विलेवाट लावून

गांव प्लॅस्टीक कचरा मुक्त करण्यासाठी सर्व गावकर्यांनी सहकार्य करावे असे सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी ग्राम पंचायत अधिकारी रविंद्र इंगळे, ग्राम पंचायत चे सर्व सदस्य, गावातील दिनेश धाडसे,

मो. अफ्तार , वाय एस पठाण सर, डां. शेख चांद, शेख, गजानन डोंगरे, अकील, रुपेश जंजाळ,

सर्व ग्राम पंचायत कर्मचारी, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून गावातील तसेच जिल्ह्यातील प्लास्टिक पिशव्या यांच्यावर बंदी घातली पाहिजे

जेणेकरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे प्लास्टिक पिशव्याने व प्लास्टिक वस्तूने कित्येक जनावरे मरण

पावले आहेत त्याची दखल घेत वाडेगाव ग्रामपंचायत ने घेतलेला उपक्रम सर्वोत्तम चांगला उपक्रम आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/death-torture-smashanbhumikade-janyasathi-nalayache-paani/

Related News