अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद प्रशासनाकडे आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
शेतीसाठी अत्यावश्यक असलेलं सिंचन, योग्य बाजारभाव, वेळेवर मिळणारा पीकविमा,
तसेच बँकांकडून सहकार्य न मिळणं या सर्व बाबी आजही ग्रामीण भागात दिवास्वप्न ठरत आहेत.
परिणामी, अडचणीत सापडलेले अनेक शेतकरी नैराश्यात जात असून, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.
गेल्या २५ वर्षांत अकोला जिल्ह्यात ३१९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचंही धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.
ही बाब केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठीही चिंतेचा विषय बनली आहे.
शासनाच्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने आणि शेतकऱ्यांचे
प्रश्न केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने, ही परिस्थिती दिवसेंदिवस बळावत आहे.
तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचनाची सोय,
किमान हमीभाव, कर्जमाफी, वेळेवर विमा भरपाई आणि प्रभावी मनोबल वाढवणारे उपाय अत्यावश्यक आहेत.