आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
खोल खड्डे पडले त्यामुळे सदर रस्ता अपघाताचा बनला आहे. तरी संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
पातूर तालुक्यातील बाभुळगाव आलेगाव रस्त्याचे रुंदीकरण ३ ते ४ वर्षापूर्वी कार्ला गावा पर्यंत करण्यात आले.
दरम्यान कार्ला ते आलेगाव पर्यंत सदर रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही.त्यामुळे चारचाकी अप डाऊन करणाऱ्या वाहनांची चाके
चिखलात फसत असल्यामुळे आणि वाहन पलटी होण्याच्या भीतीने वाहन चालक सडकेच्या खाली टाकीत नाहीत त्यामुळे,वाहन
चालकांमध्ये वाद होण्याचे प्रकार नीत्याचे झाले आहे.त्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे झाला होता महीलेचा २०१७ मध्ये मृत्यू
२१ सप्टेंबर २०१७ रोजी आसोला येथील दांपत्य आलेगाव येथील प्रा आ केंद्र येथे पत्नीच्या प्रसूती तपासणी करीता
दुचाकीने जात असताना कार्ला येथे सडकेच्या कडेला मोठ,मोठे खड्डे पडलेले होते.त्या खड्ड्यातून दुचाकी सडकेवर घेत
असताना बाईक घसरून सडकेवर कोसळली आणि मागाहून येणाऱ्या ट्र्याक्टर चे चाक महिलेच्या पोटावरून गेल्याने महिलेस प्राणास मुकावे लागले होते.
सद्या कार्ला ते आलेगाव पर्यंत सडकेच्या कडेला मोठ,मोठे खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे सदर रस्ता अपघाताचा बनला आहे.
वरील अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगाने रस्त्याचे रुंदीकरण करावे सद्या पावसाचे दिवस
असल्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे तात्काळ भरून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.