पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे रूपांतर तलावात झाल्याचे चित्र आहे. अनेक शेत रस्त्याचे काम करण्यात आले,
मात्र रस्त्याच्या बाजूने नाली काढण्यात आली नसल्याने साचलेला पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे.
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
तसेच अनेक गावातील रस्त्याची दुरुस्ती अद्यापही करण्यात आली नाही, त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जातच येत नसल्याने शेतीची कामे रखडली आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज असताना संबंधितांच्या दुर्लक्षामुळे दुरुस्ती अभावी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
शेतापर्यंत बैलगाडी नेता येत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामासाठी खत बियाणे फवारणी औषध व शेती अवजारे डोक्यावर घेऊन जावे लागत आहे.
याकडे संबंधितांनी दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
सस्ती येथे अनेक शेत रस्त्याची दुरुस्ती थातूरमातूर करून लाखोंचे देयक हडपण्यात आले,
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यासाठी शिवसंग्रामसह शेतकऱ्याकडून दोन वेळा रस्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले,
परंतु प्रशासनाकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही परिणामी शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल
दिलीप परनाटे जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम
प्रशासनाचा ढसाळ कारभार : शेतकरी वैतागले !
पातुर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आश्वासन दिले जाते ,
मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती “जैसे थे” आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे शेतकरी वैतागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pandit-vitthal-bhaktancha-mahapur/