अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून,
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ते कॉलराने बाधित होते, हे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी, एक नागरिक गमावल्यानंतरच यंत्रणा जागी झाली,
अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच हा बळी गेला.
गावात प्रतिबंधात्मक उपाय सुरू
घटनेनंतर धामणा गावात कॉलराचा अधिकृत उद्रेक जाहीर करण्यात आला असून,
आरोग्य विभागाच्या ४ पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे.
गावात सध्या ८० घरे असून, सर्व घरांची तपासणी करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्यावर भर
गावकऱ्यांना पाणी उकळून पिण्याचे, आर.ओ. पाणी किंवा मेडिक्लोर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
करोडी उपकेंद्रामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
गावात आरोग्य शिक्षणाचे कामही सुरू असून, डायरिया व कॉलरासदृश लक्षणांकडे तातडीने लक्ष देण्यात येत आहे.
ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे दूषित पाण्यामुळे कॉलराचा प्रादुर्भाव झाला, असा आरोप करत,
जलस्रोतांची तातडीने स्वच्छता करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
“आरोग्य विभागाने वेळेवर लक्ष दिलं असतं, तर माझ्या पतीचा जीव वाचला असता,”
– बद्रे कुटुंबीयांची प्रतिक्रिया.
या प्रकरणानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे निर्देश देण्यात आले असून,
पुढील काही दिवस गावात विशेष देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ridhora-nag-prajaticha-venivar-sap-gharat-aadhala/