अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी
आलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. तर आगामी खरीप हंगामाची तयारीही खोळंबली आहे.
अकोल्यातील गोरेगाव बुद्रुक परिसरात रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे तेजराव पाटील
Related News
या शेतकऱ्याच्या शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाला आहे.
तर तीळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह
जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
तातडीने या नुकसानीचा सर्व्हे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jyoti-malhotra-chi-khari-okh-kya/
