देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Related News
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
विशेष म्हणजे, एकट्या मुंबईत ५६ रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
कोरोना संसर्गावर पुन्हा अलर्ट
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची वाढ पाहता, भारतातही केंद्र सरकारने कोरोना अलर्ट जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना RT-PCR टेस्टिंग वाढवण्याचे, हॉस्पिटल्समध्ये तयारी
ठेवण्याचे आणि लसीकरणाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासन सज्ज, खबरदारीचे उपाय सुरू
आरोग्य यंत्रणांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला असून,
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
➡️ मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासन सतर्क
➡️ देशभरात प्रतिबंधात्मक उपाय सुरू, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश
➡️ सामान्य नागरिकांनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा आणि आरोग्य तपासणीसाठी पुढे यावं
कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला असून,
नागरिकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sonyachaya-darat-punha-vadha/