जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;

जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;

किन्हीराजा | प्रतिनिधी

किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या

शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.

Related News

गोंडाळ यांच्या शेतातून सोनल प्रकल्पावर जाणारी विद्युत वाहिनी गेली आहे.

या वाहिनीतील एक जिवंत वायर तुटून जमिनीवर पडली, आणि त्याचवेळी जनावरे शेतात

चराईसाठी असताना या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तिन्ही जनावरे जागीच ठार झाली.

या घटनेत मृत्युमुखी पडलेली जनावरे अशी – १ म्हैस, १ गाय आणि १ बैल, ज्यांचे एकूण अंदाजे

२ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,

अशी माहिती तलाठी एन. व्ही. अंबुलकर यांनी पंचनाम्यातून दिली आहे.

स्थानिकांकडून महावितरणवर संताप

या घटनेमुळे गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या

हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, विद्युत विभागाने वारंवार तक्रार करूनही

जुनी आणि खराब वायर बदलण्यात दिरंगाई केली, असा आरोप करण्यात येत आहे.

शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका

वैजनाथ गोंडाळ यांचं शेती आणि दुग्धव्यवसायावर मोठं आर्थिक अवलंबित्व असून,

या घटनेने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/vaishakh-pornemechaya-lakhkkat-katapurna-sanctuary-cross/

Related News