इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्यान रावळपिंडी येथील लष्करी
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
मुख्यालयासह क्रिकेट स्टेडियमवरही ड्रोन हल्ले करण्यात आले.
या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) तात्काळ स्थगित करण्यात आली
आणि नंतर स्पर्धा युएईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर PSL 2025 मध्ये सहभागी असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेटपटू रिशाद होसैन
यांनी एक खळबळजनक खुलासा करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप केले आहेत.
“ड्रोन हल्ले सुरू असताना आम्हाला कराचीत खेळत राहण्यास भाग पाडले जात होते,” असे त्यांनी म्हटले.
रिशादच्या म्हणण्यानुसार, PCB अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी PSL खेळणाऱ्या देश-विदेशातील खेळाडूंना
प्रत्यक्ष स्थितीबाबत काहीही माहिती दिली नव्हती. ड्रोन हल्ल्यांमुळे अनेक खेळाडू भयभीत झाले होते
आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंतेत होते. खेळाडूंनी विरोध करताच स्पर्धा युएईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“पाकिस्तानमध्ये राहून खेळणे सुरक्षित नाही, हे सर्वांना जाणवले होते.
आम्ही तातडीने देश सोडण्याचा निर्णय घेतला,” असेही रिशादने स्पष्ट केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-action-pakistanchaya-fighter-jetla-damage/