नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे भारताविरुद्ध करण्यात
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
भारत-पाकिस्तान तणावावर चीनची चिंता वाढली ;
येणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ‘युद्ध’ म्हणून मानली जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारतात २६ ठिकाणी दहशतवादी
कारवाया करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ही ठोस भूमिका घेतली आहे.
दहशतवाद म्हणजेच युद्ध
सरकारच्या नव्या भूमिकेनुसार, पाकिस्तानकडून प्रायोजित कोणतीही दहशतवादी घटना थेट युद्ध मानली जाईल
आणि त्याला सैनिकी उत्तर दिलं जाईल. यामुळे भारताची सुरक्षा नीती अधिक आक्रमक आणि परिणामकारक होणार असल्याचं मानलं जात आहे.
या निर्णयामुळे, पाकिस्तानला ‘नॉन-स्टेट अॅक्टर्स’च्या आड लपता येणार नाही,
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय भारताच्या ‘झीरो टॉलरन्स टू टेररिझम’ धोरणाला अधिक ठोसपणे अधोरेखित करणारा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/undergrained-bahujan-young-man-aghadichya-vati-donation-shibir/