मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले असून,
पुढील आठवडाभर हवामान अस्थिर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
9 ते 15 मे 2025 या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
Related News
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
EPFO E-PRAAPTI Portal : विसरभोळ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चे ‘ब्रह्मास्त्र’; आता जुन्या PF खात्यातील अडकलेले पैसे मिळवणे होणार सोपे
EPFO E-PRAAPTI Portal : निष्क्रिय PF खात्यांमधील ...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
कमाल व किमान तापमानात घट होण्याचे संकेत आहेत. बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी,
जालना या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी शेतात उभी पिके जमीनदोस्त केली आहेत.
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून,
मेघगर्जनेसह गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
काढणी झालेली हळद योग्य प्रकारे वाळवून सुरक्षित गोदामात साठवावी.
उन्हाळी भुईमुगात रसशोषक किडींचा बंदोबस्त करण्यासाठी निंबोळी अर्क किंवा नैसर्गिक कीडनाशकांची फवारणी करावी.
केळी, आंबा, द्राक्ष या फळपिकांमध्ये वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या फळगळ रोखण्यासाठी सावली व पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा.
द्राक्ष छाटणी पावसाच्या आधीच पूर्ण करावी आणि बागेत योग्य खत व्यवस्थापन करावे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jammu-and-kashmir/