शिरगाव (गोवा) | प्रतिनिधी –
गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई देवीच्या वार्षिक यात्रेदरम्यान शुक्रवारी रात्री भीषण चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
सध्या जखमींवर गोमेकॉ (GMC) आणि मापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गर्दीचा ताण आणि अचानक गोंधळ
शुक्रवारी रात्री श्री लैराई देवीच्या यात्रेकरिता शिरगावमध्ये राज्यभरातून आणि परदेशातूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
यावेळी एका मिरवणुकीदरम्यान अचानक मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
अनेक भाविक एकमेकांवर कोसळले, काहींना श्वास घेण्यास त्रास झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला.
मुख्यमंत्री सावंतांनी घटनास्थळी भेट दिली
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी नंतर मापसा आणि जीएमसी रुग्णालयात जाऊन जखमी भाविकांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक जखमी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन वरून या घटनेची माहिती घेतली असून केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले आहे.”
राज्यातील पुढील तीन दिवसांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसकडून श्रद्धांजली व सहवेदना
गोवा काँग्रेसनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “शिरगाव यात्रेतील दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले,
त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
जखमी भाविकांना लवकर बरे वाटावे, हीच प्रार्थना.”
प्रशासनाकडून अद्याप अधिकृत खुलासा नाही
या चेंगराचेंगरीचे नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
मात्र प्राथमिक माहितीनुसार, अचानक गर्दी वाढल्यामुळे गोंधळ उडून ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/intestinal-anandcha-moments/