शिरगाव (गोवा) | प्रतिनिधी –
गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई देवीच्या वार्षिक यात्रेदरम्यान शुक्रवारी रात्री भीषण चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”
पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची टरकली; पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला
ऑपरेशन सिंदूरनंतर वीरेंद्र सेहवाग, रैना आणि राहुल गांधी यांची भारतीय लष्कराला सलामी
सध्या जखमींवर गोमेकॉ (GMC) आणि मापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गर्दीचा ताण आणि अचानक गोंधळ
शुक्रवारी रात्री श्री लैराई देवीच्या यात्रेकरिता शिरगावमध्ये राज्यभरातून आणि परदेशातूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
यावेळी एका मिरवणुकीदरम्यान अचानक मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
अनेक भाविक एकमेकांवर कोसळले, काहींना श्वास घेण्यास त्रास झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला.
मुख्यमंत्री सावंतांनी घटनास्थळी भेट दिली
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी नंतर मापसा आणि जीएमसी रुग्णालयात जाऊन जखमी भाविकांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक जखमी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन वरून या घटनेची माहिती घेतली असून केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले आहे.”
राज्यातील पुढील तीन दिवसांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसकडून श्रद्धांजली व सहवेदना
गोवा काँग्रेसनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “शिरगाव यात्रेतील दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले,
त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
जखमी भाविकांना लवकर बरे वाटावे, हीच प्रार्थना.”
प्रशासनाकडून अद्याप अधिकृत खुलासा नाही
या चेंगराचेंगरीचे नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
मात्र प्राथमिक माहितीनुसार, अचानक गर्दी वाढल्यामुळे गोंधळ उडून ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/intestinal-anandcha-moments/